तीन टक्के कमिशन मंजूर नाही; अभिकर्त्यांनी कलेक्शन बंद करावे
जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांचे आवाहन
नित्यनिधी अभिकर्त्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत संताप
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- नित्यनिधी अभिकर्त्यांचे कमिशन चार टक्क्यांवरून तीन टक्के करण्याचे आदेश सहकार आयुक्त, पुणे यांनी दिल्याने संपूर्ण राज्यातील नित्यनिधी अभिकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. कमिशन कपातीच्या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यातील अभिकर्त्यांनीही तीव्र निषेध व्यक्त केला असून, हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट रोजी तुमसर येथील खंडेलवाल सभागृहात नित्यनिधी अभिकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर आदी तालुक्यांमधून सुमारे ७०० ते ८०० अभिकрте बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांनी कमिशन कपातीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. चार टक्के कमिशनवर काम करणाऱ्या अभिकर्त्यांवर आता तीन टक्के कमिशनचा बोझा टाकणे अन्यायकारक आहे. तीन टक्के कमिशन देणाऱ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व अभिकर्त्यांनी कलेक्शनचे काम बंद करावे. तसेच मशीन बँकेत जमा करून खातेदारांना त्यांची रक्कम तात्काळ काढून देण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
नित्यनिधी अभिकрте हे दिवसभर गावोगावी फिडून खातेदारांकडून रक्कम जमा करतात. अनेक अभिकर्त्यांचा उदरनिर्वाह याच कमिशनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत चार टक्क्यांवरून तीन टक्के कमिशन करण्यात आल्यास अभिकर्त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे शासन व सहकार विभागाने अभिकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन कमिशन कपातीचा निर्णय तडाdine मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीस प्रभु भाजीपाले, विनोद भुरे, प्रशांत लांजेवार, जयदेव गिरडकर, अरुण माकडे, विलास नरुले, सुधाकर वजाडे, अमोल भुरे, शरद मोहरकर, अनमोल सेलोकर, नित्यानंद गिरडकर, शिवशंकर जांभुलकर, विलास आरीकर, उमेश नखाते, दत्तू मेश्राम, मनीषा बावनकर, माया थेरे यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यांमधील पदाधिकारी आणि असंख्य अभिकर्ते उपस्थित होते.
कमिशन कपातीचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्ह्यातील अभिकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरविण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. त्यामुळे नित्यनिधी अभिकर्त्यांच्या प्रश्नावर आगामी काळात सहकार विभागासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताुकाध्यक्ष सेवचंद झंझड, विनोद लांजेवार, नितीन पडोळे, दिनेश भिवगडे, अमित पारसे, प्रविण मानापुरे, सुहास बडवाईक, राजेश निखाडे, मुनेश मते, यांनी अथक परिश्रम घेतले.








