सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त शेतकरी गोसेखुर्द प्रकल्प कार्यालयावर धडकले
सध्या धानाच्या नर्सरीसाठी पाण्याची अंत्यंत आवश्यकता असल्याने १ जानेवारी रोजी पाणी सोडण्याची मागणी सबंधीत शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार सबंधीत अधिकाऱ्यांनी नहराला पाणी सोडले. परंतु, सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचु न देता पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ४०-५० शेतकऱ्यांनी थेट आंबाडीचे कार्यालय गाठुन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांची वैफियत ऐकुन सिंचनासाठी पाणी सोडुन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही तो पर्यंत पाणी सुरु राहील, असे आश्वासनदिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपली आंदोलनात्मक भुमिका मागे घेतली. यावेळी गोपाल रोहनकर, विलास दहेलकर, केशव रोहनकर, प्रदीप शेंडे, भास्कर रोहनकर, नाशिक मेश्राम, गुलाब मेश्राम, दादा रोहनकर, मछिंद्र शेंडे, पुण्यवान मेश्राम, नरेश भोयर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.