शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा अंतिम प्रवास
मुंबई:- भारतीय राजकारणातील सौम्य, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले.
मराठवाड्यातील चाकूर गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक, राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला आणि पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले.









