रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- लाखनी तालुक्यात असलेल्या १०४ गावांसह ग्रामीण भागांतील जवळपास सर्वच गावांमध्ये विविध प्रवर्गातील अनेक योजनांतर्गत हजारो घरकुले मंजूर झाले आहेत. मात्र ही घरांचे पक्के बांधकाम करण्यासाठी रेती मिळत नसल्याने सदर बांधकाम रखडले आहे. शासनाने रेतीची पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभाथ्र्यांकडून केली जात आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे, त्यांच्या निवाèयाचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देणारी घरकुल योजना शासनाने १५ नोव्हेंबर २००८ पासून सुरू केली. त्या अनुषंगाने रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व इतरही अनेक योजनांचे घरकुले मंजूर आहेत.
यातील सर्वच घरकुलांचेत बांधकाम सुरू असले तरी बहुतांश घरकुलांचे बांधकाम रेती मिळत नसल्याने रेती अभावी रखडले असल्याचे ज्वलंत चित्र आहे. विशेष म्हणजे लाखनी तालुक्यातील कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने घरकुल बांधकामासाठी रेती आणायची तरी कुठून असा, प्रश्न स्थानिक व ग्रामीण भागातील लाभाथ्र्यांसमोर निर्माण झाला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत स्वत:च्या घराच्याबांधकामासाठी पाच ब्रास रेती काढण्यास परवानगी देण्याबाबतचे परिपत्रक वेळोवेळी काढण्यात आले. मात्र तरीही रेती मिळत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.