देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर ३०२ दाखल होईल का? बीडचे डझ कावतांनी स्पष्टच सांगितलं
बीड:- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच, सीआयडी पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही, योग्य दिशेने तपास सुरू आहे का, हेही आम्हाला समजत नाही. माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जिवाला धोक आहे, मग मीच स्वत:ला संपवून घेतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील टाकीवर चढून १३ जानेवारी रोजी आंदोलन केले. अखेर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला. तर, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हेही गावात आले होते. पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याबाबत थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं.
धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. डखढ वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील. सध्या मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, असे बीडचे एसपी नवनीत कावत यांनी म्हटलं आहे. वाल्मिक कराडवर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखलकेला जाईल का, असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असे स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.