गोसे खुर्द धरणग्रस्तांनाच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणार – खा. डॉ. प्रशांत पडोळे
पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. नेरला, सूरबोडी या गावचे अधिग्रहण करण्यात आले नाही. ३६ वर्षाचा पदिर्घ काळ लोटून गेला मात्र धरणाचे काम पूर्ण झाले परंतु लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले नाही, आजही मोठ्या प्रमाणात आरडा ओरड सुरू आहे. धरणग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही, न्याय मिळू शकला नाही ही मोठी शोकांतिका आहे. या भाजप केंद्र आणि राज्य सरकारच्या दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे परत नविन समस्या निर्माण झाल्या आहेत.
गोसेच्या समस्या तात्काळ सोडवाव्या. अन्यथा मोठे जनआंदोलन करू असेही यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज झालेल्या आंभोरा येथील बैठकित सांगितले. यावेळी डॉ. प्रशांत पडोळे खा.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र, अभिजितजी वंजारी आ.पदविधर मतदार संघ, द्वीजेंद्रजी शर्मा सेवानिवृत्त न्यायधिस, रामजी बांते, भाऊ कातोरे, भागवतजी दिघोरे, कृष्णाजी घोडेस्वार, शिवशंकरजी माटे, प्रमिलाताई शहारे, आकाशजी भोयर तसेच गोसेखुर्द परिसरातील नागरिक, शेतकरी,शेतमजूर, मच्छीमार बांधव यावेळी उपस्थित होते.