राज्याच्या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला-पालकमंत्री पंकज भोयर

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे बजेट सादर केले आहे. राज्याच्या या बजेटमुळे राज्य आणखी गतीमान होईल. शेतकरी बांधवांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेचे मोठी घोषणा सरकार ने केली आहे. यामुळे राज्यातील शेतक-यांना आधार मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहे.

नळगंगा – वैनगंगा प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार आहे. तथापि, विदर्भ सुजलाम सुफलाम होणार आहे. लाडकी बहिण योजना प्रभावीपणे सुरू ठेवणे, महिला सक्षमीकरण, कृषि व जलसंपदा भरीव तरतूद, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड, पायाभूत सुविधांचा गतिमान विकास, शाळांना अनुदान, आरोग्य केंद्रे डिजीटल करण्याची तरतूदीसह अन्य योजना सुरू करण्यात आल्या आहे. अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची निर्मिती होणार आहे. तसेच शालेय विधार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा व संशोधनवृत्ती वाढावी यासाठी मुख्यमंत्री विधार्थी विज्ञान वारी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *