भंडारा, गोंदियातील ४ हजार ४०० माजी मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ४ हजार ४०० मालगुजरी तलवांचे आता पुनरुज्जीवन होणार असून हे सगळे तलाव टप्प्या टप्प्याने गाळमुक्त होणार आहेत. यासंदर्भात विधानपरिषदेचे भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वपूर्ण सूचना केली होती. तसेच, या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवले होते.

याची दखल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचबरोबर याविषयी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सचिवांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलवून हे तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच, याकामी सरकारसह टाटा, नाम फाऊंडेशन गाळउपसण्याचे कार्य करणार आहेत. यामुळे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *