कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटका पर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे -आ. राजू कारेमोरे
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनि शेवटच्या घटका प्रर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानवरून आम. राजू कारेमोरे यांनी १० जून ला मोहाडी येथे २६ व्या वर्धापन दिनी केले. १० जून १९९९ राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करण्यात आली, त्यानंतर आज १० जून २६ वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात थाटात साजरा होत आहे, राष्ट्रवादी पक्षाने जनतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे, अजितदादा पवार, प्रफुलभाई पटेल, सुनिल तटकरे, छगनजी भुजबळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे. आणि पक्षाची मोठी बांधणी करुन पक्षाची सदस्यता मोहीम मोठ्या उत्सहात होत आहे, नवीन नवीन लोक मोठ्या संख्येत पक्षात प्रवेश करत आहे. पक्षाने लोकाभिमुख कार्य अविरत केले आहे, असे आम. राजू कारेमोरे बोलत होते. १० वाजून १० मिनिटांनी पक्षाचे ध्वजाचे ध्वजारोहन आम. राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधणे, जिल्हा महासचिव विजय पारधी, जिल्हापरिषद सभापती नरेश ईश्वरकर, जिल्हापरिषद सभापती आनंद मलेवार, पंचायत समिती सभापती जगदीश शेंडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रिताताई हलमारे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, वरठी शहर अध्यक्ष अरविंद येळने, महिला शहर अध्यक्ष मनीषा गायधणे, अनिताताई गजभिये, प्रतिमा राखडे, रागिणीताई शेलोकर, प्रीती शेंडे, युवक अध्यक्ष रोहित बुरडे, मोहाडी शहर युवक अध्यक्ष विक्की सिंघनिया, चंद्रकुमार शेलोकर, विष्णू भोयर, बादल गायधणे, ज्ञानेद्र आगासे, खुशाल कोसरे, भौदास साठवणे, याकूब बर्वे, आगासे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम स्थळी सभासद नोंदणी पुस्तकाचे वाटप सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुभाष गायधणे यान्ही केले तर प्रास्ताविक सदाशिव ढेंगे यांही केले तर आभार पवन चव्हाण यान्ही केले.