गावतलावाचे सौंदर्यीकरण की विद्रूपीकरण?

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकीकडे मुख्य शहर एकोडी रोड ते तलाव वार्ड प्रभागातील गावतलावाचे सौंदर्यीकरणाचे सुसज्जीत कार्य प्रगतीपथावर आहे. तर दुसरीकडे काही बेजबाबदार जनता तलाव बायपास मार्गावर घरगुती कचरा आणि घरातील खरकटे अन्न आणून टाकतात. यावर येथील जनता किती जागरूक आहेत याची प्रचिती नुकतीच घडलेली असून माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. जनतेचे कार्य काय असते? निव्वळ नगरसेवक, पत्रकार व पोलीसच समस्या सोडविण्यासाठी वारंवार जनतेच्या मदतीला धावणार काय? तर जनतेनेही जागरूक होऊन जनतेचे कर्तव्य काय हे समजून घेणे आज आवश्यक आहे. जनतेला याचे थोडेही भान नाही की, आपल्याच घरासमोरून सुसज्ज तलाव सौंदर्याचे काम सुरू आहे. करोडो रुपये खर्च करून शासन जनतेसाठी हिरव्या वातावरणात एक सौंदर्यात भर घालून हा परीसर प्रकाशझोत आणित आहेत.

परंतु काही बेजबाबदार जनतेच्या अश्या या उर्मट वागण्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे जनतेला समजून घेणे आवश्यक आहे. साकोली शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी समस्त जनतेला विनंती आवाहन केले आहे की, सर्वांनी आपले शहर स्वच्छ कसेराहील व आपण जनतेचे काय कर्तव्यदक्ष कार्य आहे हे समजून घेतले पाहिजे. आपणच घाण करू तर इतरही घाण करतील म्हणून आपला वार्डात, आपल्या घरासमोर स्वच्छता कशी कायम राहील याची काळजी घ्यावी व सार्वजनिक सौंदर्य निर्माण स्थळांवर कुणीही घाण कचरा आणून टाकू नये असे आवाहन “साकोली मिडीया व व्हाट्सअप ग्रुप वर फोटो टाकून” समस्त साकोली सेंदूरवाफा शहरातील जनतेला केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *