बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल; यंदाही मुलींचीच सरशी

गोंदिया:- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवार ५ मे २०२५ रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला.नागपूर विभागात, गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वषर्ी अव्वल स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. गेल्या वषर्ी गोंदिया जिल्ह्याचा निकालाची ९५.२४ टक्के झाले असते. या वषर्ी त्यात १ टक्क्यांनी घट झाली आहे. प्रत्यक्षात, जिल्ह्याने नागपूर विभागात पहिले स्थान कायम ठेवले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील एकूण १७९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १७९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एकूण १६८४१ विद्याथर्ी उत्तीर्ण झाले. त्याची एकुण टक्केवारी ९४.०४ टक्के आहे.तर निकालात मुलींनीच अधिक बाजी मारली आहेत. बारावीच्या परीक्षेला एकूण ९२१४ विद्याथर्ी तर ८६९४ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८४५६ विद्याथर्ी व ८३८५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.७७ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.४४ टक्के आहे.

गोंदिया जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचानिकाल सरस आहे. जिल्ह्यात तिरोडा तालुका बारावीच्या निकालात टॉप ठरला आहे. गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.४२ टक्के, आमगाव ९२.०९ टक्के, अर्जुनी मोरगाव ९६.९८ टक्के, देवरी ९३.८८ टक्के, गोरेगाव ९१.६० टक्के, सडक अर्जुनी ८६.५१ टक्के, सालेकसा ९५.६१ टक्के, तिरोडा तालुक्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात गोंदियाजिल्ह्याने गौरवपूर्ण निकालाची परंपरा यावषर्ी ही कायम राखली आहे.बारावी परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियानाची कडक अमल बजावणी करण्यात आलीअसतानाही गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला असून गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. उत्तीर्ण मध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *