जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के, विभागात सहावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध करत विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक आणि तांत्रिक अशा पाचही विद्या शाखांमधून एकत्रित पहिल्या तिन्ही स्थानांवर त्यांच्या विद्यार्थिनी विराजमान झाल्या आहेत. यावर्षी कॉपीमुक्त धोरणाची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने मागच्यावर्षी पेक्षा निकालात ७.१ टक्क्यांची घट झाली आहे. मागच्या वर्षी ९४.६८ टक्के लागला होता.

यावर्षी ८७.५८ टक्के निकाल लागला. नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या आन्या रणजित उजवने हिने ९७.८३ टक्के गुण मिळवून संपूर्णजिल्ह्यात सर्व शाखांमध्ये एकूण प्रथम क्रमांक पटकावला. त्याच महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या मधू नरेश अंगवानी हिने ९७.६७ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला तर प्रांजु चंद्रकुमार बलवानी हिने ९४.६७ टक्के गुणांसह तिसरे स्थान मिळवले. विज्ञान, वाणिज्य, कला, वोकेशनल आणि तांत्रिक अशा सर्व शाखांमध्ये नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व राखले. विज्ञान शाखेत मातोश्री क. महा. तुमसर येथील कृष्णा कैलाश इसरानी याने ९२.१७ टक्के मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

गांधी विद्यालय कोंढा येथील अर्थवे अनिल देशमुख यांने ९२ टक्के गुण घेवून द्वितीय तर संत गुलाब बाबा डिफेन्स सर्व्हिसेस ॲकॅडमी चा विद्देश राहीगुडे याने ९१.६७ टक्के गुण मिळवून तृतीय स्थान मिळवले. नूतन कन्या क. महाविद्यालयाची शर्वरी नारायण जुवार हिने ९१.१७ टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेत देखील नूतनकन्या कनिष्ठ महाविद्यालयाने पहिले ३ क्रमांक पटकावून आपले वर्चस्व राखले. मानसी संजय कोवे हिने ९३.८३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर साहिली लव झंझाडे हिने ८९.३० टक्के गुणांसह जिल्ह्यात दुसरा आणि लोकेशा मुरलीधर नंदरधने हिने ८९.५० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *