कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका-डॉ. प्रशांत पडोळे

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर आतापर्यंत महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी या कर्मचारी पोहचू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी तरी सरकारच्या दबाव देऊन काम करू नका. असे खडेबोल अधिकाऱ्यांना यावेळी सुनावले. आपल्या कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. बऱ्याचदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सहाय्यक, गावातील श्रीमंत शेतकरी यांच्या कडे जाऊन योजनेची माहिती देत असल्याची माहिती गावातील शेतकऱ्यांनी यावेळी दिली. कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे आपल्या विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. त्यांच्या नुकसान झालेल्या शेतपिकाचे पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. हे किती योग्य आहे? शेतकऱ्यांच्या शेतपंचनामे नुकसान भरपाईचे कसे करता, ते सर्वांना माहिती आहे. पंचनामे करित करीत असताना शेतकऱ्यांना का वंचित ठेवले जाते. रब्बी पिक, आणि खरीप हंगामाच्या पिकाची वेळेत शेतकऱ्यांना त्या गावापर्यंत जावून माहिती द्या. गावागावात कार्यशाळा लावा. पुढची बैठक संयुक्त घ्या. महसूल, कृषी, पसुवर्धन या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कार्यशाळेत बोलवा, असेही यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करणार असल्याचे यावेळी सांगितले. युरिया खताचा तुटवठा पडू देऊ नका. कृषी केंद्रावर लक्ष घाला. शासनाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका.जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.