
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आमदार राजु कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मोहाडी येथे जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आज २६ मे सोमवारला दु. ०२ वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वेळा कार्यालयात समस्या किंवा तक्रारी घेऊन गेल्यावरही त्यांच्या समस्या सुटत नसल्याने असे नागरिक वारंवार आमदार कार्यालयाशी संपर्क साधतात. जनतेच्या तक्रारी एकाच वेळी एकाच मंचावर सोडविण्यासाठी सदर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, अवकाळी पाऊस, गारपीट मुळे शेतीचे, घरकुल, गोठ्याचे नुकसान, पंचनामे या विषयावर ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी जनता दरबार सुरू होण्याच्या एक तासापूर्वी आपल्या तक्रारी सोबत आपल्या नावाची नोंदणी करावी. व या जनता दरबाराचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार कार्यालय मोहाडी तर्फे करण्यात आले आहे.