“नवतपा’ ठरणार का तापदायक?
म्हणून उन्हाळ्याचे चार महिने लवकरात लवकर संपावेत, अशी कामना सर्व करतात. त्यातही मे महिन्यातील उन्ह म्हणजे अंगाला भाजून सोडणारे असते. घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे, अशीच सगळ्यांची इच्छा असते. मे महिन्यात सर्वाधिक ऊन तापत असून, या महिन्याच्या शेवटीच नवतपा लागतो. नवतपा म्हणजे नऊ दिवसांचा काळ असून, या नऊ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते, असे म्हटले जाते. म्हणजेच,उन्हाळ्याच्या चार महिन्यांतील उन्हाची कसर या नऊ दिवसांत भरून निघते, असे म्हटले जाते. म्हणूनच नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो. मे महिन्याचा शेवट व जून महिन्यातील दोन दिवस हा नवतपा घेणार आहे. मात्र, यंदा मे महिन्याने एकीकडे जेथे चांगलेच तापवले आहे, तेथेच अधामधात ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असल्याने यंदाचा नवतपा पावसात निघून जावा, अशी सर्वांची देवाकडे मागणी आहे.