उष्माघात आणि अति थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आपत्तीत व्हावा
जिल्ह्यात तापमानाचा पारा ४७ सेल्सिअस पर्यंत गेल्याची व थंडी मध्ये पारा ९ सेल्सिअस पर्यंत गेल्याची नोंद आहे. प्रचंड तापमानात व थंडी मध्ये सुद्धा शेतकरी, शेतमजूर, अन्य कामगार आणि आर्थीक दृष्ट्या कमकुवत नागरिक उदरनिर्वाहाकरिता घराबाहेर पडतात. उन्हाळ्यात “हीटस्ट्रोक’ म्हणजे उष्माघात आणि हिवाळ्यात “हायपोथर्मिया’ म्हणजे अत्यंत थंडीमुळे जीव गमावतात. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना शासनाची कोणतीच आर्थिक मदत मिळत नाही. उन्हाळ्यात प्रचंड वाढत चाललेले व हिवाळ्यात कमी होत असलेले तापमान आणि यात लोकांचे जाणारे जीव यांचा विचार करता उष्माघात आणि अति थंडी याचा समावेश आपत्तीमध्ये करून मदतीसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यामुळे कुटुंबावर आलेल्या संकटात शासनाची ही मदत आधार देणारी ठरेल. त्यासाठी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असेही पत्रात म्हटले आहे.