अन्यथा आघाडीच्या नेत्यांची तिसरी फळी उतरणार रिंगणात – अनिल बावनकर

दै.लोकजन वृत्तसेवा तुमसर :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात भाजपने ९९ उमेदवारांची अधिकृत घोषणा देखील केली. मात्र आघाडीचे अद्याप ठरलेच नाही. याच मुद्द्यावरून तुमसर मोहाडी विधानसभेवर चरण वाघमारे विरुद्ध अडलेल्या आघाडीच्या नेत्यांनी तडकाफडकी पत्र परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई वारी करून आलेल्या शरद गट तथा काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी माजी आमदार अनिल बावनकर यांच्या व्यावसायिक संकुल कार्यालयात रविवार २० ला पत्र परिषदेतून विधानसभेची तिसरी फडी सज्ज झाल्याची स्पष्टोक्ती केली आहे. चरण वाघमारे यांच्या तुतारी पक्षाच्या प्रवेशामुळे विधानसभेत गोंधळ उडाला होता. आघाडीच्या नेत्यांचा एकसुरात वाघमारेंचाविरोध शमता शमत नसल्याने ती राजकीय विरोधाची आग अखेर विद्रोहात बदलली आहे. या बाबत दैनिक नवराष्ट्राने १४ ऑक्टोंबरच्या अंकात याबाबत विश्लेषणात्मक शंका उपस्थित केली होती. ती शंका अनिल बावनकर यांच्या पत्र परिषदेनंतर शाश्वत ठरली आहे, हे विशेष!