“लोकांना आता ठोस कामं हवी, करमणूक नकोय’; रावसाहेब दानवेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

मुंबईः- शिवसेनेचा ५८ व्या वर्धांपन दिनानिमित्त दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत बुधवारी पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धांपन दिन षण्मुखानंद सभागृहात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आत्तापासून सुरु करा, असे आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले. तर खासदार संजय राऊत यांनी मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे, बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे, अशी टीका केली. आता यावर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.