नवनिर्वांचित खासदार साहेब, सडक अर्जुनीत एमआयडीसी हवी

सडक अर्जुनी:- १५ ऑगस्ट १९९२ रोजी सडक अर्जुनी तालुक्याची निर्मिती झाली. ६ जून ला ३२ वर्षांनंतरही तालुक्याचा विकास शून्यच आहे. तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व पारंपरिक व्यवसाय शेती आहे. मात्र, निसर्गांच्या अवकृपेमुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न घेता येत नाही. त्यामुळे शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी तालुक्यात एमआयडीसी उभारूनपरिसराचा औद्योगिक विकास करणे गरजेचे आहे. यासाठी सडक अर्जुनी येथे एमआयडीसीची आवश्यकता आहे. म्हणून नवनिर्वांचित खासदार साहेब, सडक अर्जुनी येथे एमआयडीसी आणाच, अशी आर्त हाक तालुक्यातील युवक व बेरोजगारांची आहे. सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्र ५५४६१.६२ हेक्टर आर. आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख १५ हजार ५९४ इतकी आहे. एकूण कुटुंब संख्या २५ हजार ६६ असून, त्यामध्ये १४, ४३३ दारिर्द्य रेषेखालील कुटुंबे आहेत. चार-पाच गावांमध्ये बुरड व्यवसाय आहे. त्या माध्यमातून बुरड कामगार सूप, टोपल्या आदी वस्तू तयार करून विकतात व त्यावर आपला उदरनिर्वांह चालवितात. त्यांना वेळेवर शासनाकडून बांबूदेखील उपलब्ध होत नाही.एकूण क्षेत्रांपैकी १२ हजार ७५२.५० हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र आहे.

८८.२९ हेक्टर क्षेत्र कोरडवाहू जाहे. १९ हजार ८६५ क्षेत्र खरीप पिकाखालील आहे. ३ हजार ३७५.१५ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकाखालील आहे. निसर्गांच्या लहरीपणावर शेती अवलंबून आहे. नियमित शेती पिकेलच असे नाही. तालुक्यात कोणतेही लघुउद्योग, मोठे उद्योग नाहीत. परिणामी, दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगारासाठी शहारासह दुसऱ्या राज्यात मजूर, शेतमजूर, बेरोजगार, युवक स्थलांतरित होत आहेत. ३२ वर्षे तालुक्याच्या निर्मितीला झाले तरी शासनाने कोणतेच ठोस पाऊल मी एम. ए. पात्रताधारक असून, सुशिक्षित बेरोजगार आहे. ६६ नोकरी, उद्योग नसत्याने मोलमजुरी करून आपला व व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तालुक्यात उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. खासदार साहेबांनी व शासनाने याकडे विशेष लक्ष घालून सडक अर्जुनी तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी.जियालाल रंगारी, रा. तिडका. उचलले नाहीत. तसेच कोणत्याच लोकप्रतिनिधिंनी आवाज उठविलेला दिसत नाही. दरम्यान, खासदार साहेब, आपणाकडून एमआयडीसीविषयी अपेक्षा आहे, असे युवकांनी म्हटले आहे.