भंडारा शहरातील व शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी, चांगले रस्ते अशा प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यास नगर परिषद प्रशासन हे कुचकामी ठरले असल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे हे गेल्या अनेक महिन्यापासून, वर्षभरापासुन पडले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना भंडारा शहर तर्फे यापूर्वीच निवेदन देण्यात आलेले होते परंतु तरीसुद्धा संबंधीत विभागातर्फे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. भंडारा शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जे. एम. पटेल कॉलेज रोड, तुरसकर कॉम्पलेक्स समोर, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक,शास्त्रीनगर चोक, टाकळी येथील पुलाजवळील, किसान चौक, शुक्रवारी वार्ड, या सारख्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शहरातील तसेच बाहेरून शहराकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी वाहनधारकांना याचा कमालीचा त्रास होत आहे, अशा खड्यामुळे अनेक दुचाकीस्वाराचे लहान मोठे अपघात होवून काहींना जिवाला मुकावे लागले तर काहींना अपगत्व आले परंतु रोड टॅक्स देवूनही वाहनधारकांना चांगले रस्ते न मिळणे हे दुर्दैवी असून यासाठी संबंधीत विभागाचे अधिकारी पुर्णतः जबाबदार असुन रस्ते बांधकामात दर्जा जोपासल्या न जाणे हे यामागील एक प्रमुख कारण आहे.

परंतु टक्केवारी च्यालालसेने संबंधीत विभागाचे अधिकारी व शहरातील जनप्रतिनिधींना हयाचे काहीही घेणे देणे नाही. नागरीकांची, वाहन धरकांची ही अडचण लक्षात घेवून शिवसेना भंडारा शहर तर्फे २७ फेब्रुवारी २०२४ ला न.प. भंडारा, सा.बा.वि. भंडारा, हयांना निवेदने देण्यात आलेली होती परंतु संबंधीत विभागाने त्यावर कुनिही कार्यवाही न केल्यामुळे ११ मार्च २०२४ ला आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु पोलीस निरीक्षक सुर्यवंशी हयांनी आपल्या दालनात संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा घडवून आणून ८ दिवसात खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिलेले होते परंतु तरीसुद्धा कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे १२ जुन पर्यंत संबंधीत विभागाने शहरातील व शहराकडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे त्वरीत कायमस्वरूपी बुजवावेत अन्यथा शिवसेना “रस्ता रोको आंदोलन करण्यास बाध्य राहील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. सदर निवेदन देताना शिवसेनाचे खालील पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अँड रवि वाढई, शहरप्रमुख आशीक चुटे, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष मनीषभाऊ सोनकुसरे, शहर संघटक शैलेश खरोले, नरेंद्र पहाडे, सुधीर उरकुडे, राकेश आग्रे, ललितभाऊ बोंद्रे, हर्षल टेंभुरकर, चित्रागंध सेलोकर, तिलक सार्वे, गंगाधर निंबार्ते, मयुर हलमारे, अबरार मिर्झा, बालकदास परतेती, गोपीचंद गोमासे, संदिप गभणे, सुशील हटवार, आशीष गणवीर, असीम सरोदे, राहुल सोनकुसरे उपस्थित होते.